नाव :- पेरूमल मुरुगन व्यवसाय :- तमिळ प्रोफेसर नमक्कल गव्हरमेंट ऑफ़ आर्ट्स लेखन संपदा:-४ कविता संग्रह ,४ लघुकथा , ६ कादंबरी यातील ३ आज पर्यंत इंग्रजी मध्ये भाषांतरित त्यातीलच गाजत असलेली Own Part Woman. पेरूमल मुरुगम एक बेधडक लेखन करणारा तामिळ लेखक तसे जास्त परिचित नसलेला लेखक २०१५ साली मात्र त्यांच्या ‘मातुरभागा’ या आलेल्या कादंबरी मध्ये १००वर्षा पूर्वीची तमिळनाडु मधील एका महिलेची कथा मांडली आहे.या कथेत लेखकाने नामक्कल , चिरुचेंगो डे या गावातील पुत्र प्राप्ति केल्या जाणार्या जुन्या सामाजिक प्रथेचा उल्लेख आहे . त्यामुळे हिंदुत्ववाद्यांचा धर्म अभिमान संस्कृती दुखावली गेली पण डोळसपणे जर भारतीय इतिहास अभ्यासला संस्कृती अभ्यासली आदिम समाज च्या स्वैर राहणीमान अभ्यासले तर नक्कीच कोणाला पेरूमल यांचे लिखान खटकले नसते पण मुळातच मेंदू गहान आसलेली लोक विचार काय तो करणार.
▶कादंबरी मध्ये असे काय आहे की लेखकावर जिव घेणे हल्ले झाले जगने मुश्किल झाले. या कादंबरी मध्ये लेखकाने ज्या जोडप्याला लग्नानंतर मूल होत नाही ते जोडपे अर्धनारीश्वराच्या जत्रेच्या वेळेस जात व जत्रेच्या रात्रीपुरते,कोणीही कोणाशीही संग करू शकत असे.व या सबंधातुन जन्माला आलेले मूल हे ‘देवाचे मूल’ म्हणजे ओळखले जात असे.त्या विधिला ‘वराड़ी कल’ असे म्हणले जाते.त्यातील महिलाच फक्त तोंडाला मुखवटा लावून मंदिराच्या ठरलेल्या विशिष्ट भागात आधीच उपस्थित असलेल्या परपुरुषासोबत शारीरिक सबंध प्रस्थापित करत त्या जत्रेच्या एका रात्री.या अश्या विधिला धर्माचे कोंदन दिले गेले होते.म्हणजे संकट निवारण व्हावे यासाठी परमेश्वराकड़े जाणारे श्रद्दाळु लोक अनैतिक गोष्टी देवा सोमर करत त्यावर हे लोक पडदा टाकत व आज त्यावर कथा लिहानार्या माणसाचे जीवन हराम करतात.same like as महाराष्ट्रामध्ये देवदासी मुरळी देवालाच सोडल्या जातात.त्या देवाच्याच होतात.या प्रथेवर कथा लिहल्यामुळे त्यांच्याच गावातील हिंदुत्ववादी लोकांचे रक्त खवळले त्यांनी पेरूमल यांचे पुस्तके जाळले यावरच हे कट्टर लोक न थांबता त्यांनी बेदम मारहाण ही केली केस दाखल करुण पुस्तकावर बंदी ही आणली.या सर्व दबावातुन पेरूमल यांनी फेसबुक वर पोस्ट टाकली की *पेरूमल मुरुगन नावाचा आपल्यातला लेखक मेला आहे न तो देव आहे न आपला पुनर्जन्मावर विश्वास की लेखक परतून यायला* व या पुढे आपण फक्त एक शिक्षक असू. यातुन पुन्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उभा राहतो.अश्या स्थितीत राज्य सरकार ने दबावाला बळी पडने म्हणजे अभिव्यक्ती विरोधात धर्म न राज्यकर्ते यांचे झालेल कॉकटेल.
*न्यायालय भूमिका*
*मद्रास हायकोर्ट ने संविधानिक आर्टिकल 19(1) (a) नुसार दिलेला निर्णय व केलेले भाष्य*
पुस्ताकावरील बंदी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचे कारण दाखवून राज्य सरकार व हिंदुत्ववाद्यांना फटकारल व पुस्तक बंदी उठवली. लेखकाने लिहलेले पटत नसेल तर वाचु नका पण त्यांचा छळ होता कामा नये सुनावले.
*बेधड़क पेरूमल सारख्या लेखाका बद्दल मत.*त्यावर प्रसिद्ध इतिहास लेखीका रोमिला थापर काय म्हणता ते पाहू, it is the story of a childless couple with a strong desire of having a child, “depicted with admirable sensitivity, anguish and gentleness”.
(इतिहासकार रोमिला थापर के अनुसार, यह एक बच्चा होने की एक मजबूत इच्छा के साथ एक बेऔलाद दंपति की कहानी है, “सराहनीय संवेदनशीलता, पीड़ा और नम्रता के साथ दिखाया गया है।”)
माझे असे मत आहे की लेखक हा अक्षरांच्या व आजुबाजुच्या वातावरण व उपलब्ध साधन सामुग्री लिखित व स्वताच्या चिकिस्तक मेंदू च्या जिवावर पुस्तक नावाचे आपत्य जन्माला घालत असतो त्याच्याशिवाय त्या आपत्याला मारण्याचा कोणालाही आधिकार नाही.सर्व लिखानाना एकाच नजरेतुन अश्लील धर्म विरोधी पाहू नये तर त्याला असलेले पुरावे स्वीकारुन सुधारक भूमिका स्विकारावी. लैंगिक विषय आपल्या इतिहासात कधीच विटाळ म्हणून पाहिला गेला नाही उलट खुप अभ्यासपूर्वक व रसा ने चघळला गेला आहे.जर बंदीच घालायची असेल तर मग पहिले महाभारत व इतर धर्म ग्रंथ यावर बंदी घाला . देवाधी देव इंद्र देवाला धर्म बहिष्कृत केले पाहिजे.मुलीशी संग करणारा ब्रम्हा सुळावार दिला पाहिजे. लैंगिक व्यवहार हा संस्कृतीच्या अस्तित्वाचा अहम भाग आहे . मग आता महाभारत वर ही बंदी घालावी का ? तसा माझा ही पुनर्जन्मावर विश्वास नाही पण कोर्ट च्या योग्य भुमिकेमुळ तरी पेरूमल यांच्यातील सत्यान्वेषी लेखक पुनर्जीवित झाल्याने पुढील काळात त्यांचे अजुन जबरदस्त लिखाण वाचायला मिळेल ही आशा करू व आपण ही कायमच अश्या सत्यशोधक लेखाकानाची पाठराखण करत राहु…जाता जाता पेरूमल यांची कोर्ट ने बंदी उठावल्या नंतर ची प्रतिक्रियात्मक फ्लावर ही कविता
A flower blooms after a big bang Sharp fragrance Sweet countenance Shining splendour
The flower would take up and establish everything..
आशिष 8888577071